Header Ads

  • ताजा खबरें

    स्वच्छ भारत अभियानांतर्गत हॉस्पिटॅलिटीमधील उत्कृष्ट सेवेसाठी ठामपानं केला `ग्रोथ'चा सन्मान प्रतिनिधी

    ठाणे, दि. 22 : भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत `स्वच्छ सर्वेक्षण' कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेनेही राबविले आहे. ठाणे शहरातील अनेक सोसायटÎांमध्ये ही मोहिम सुरू आहे. शहर स्वच्छतेची जबाबदारी प्रशासनाबरोबर ठाणेकर नागरिकांचीदेखील आहे. याच उद्देशातून गृहसंकुलांना आपली सोसायटी स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या `ग्रोथ' या सेवा संस्थेला उत्कृष्ट कामगिरीसाठी ठामपाने सन्मानित केले आहे. 
    ठाणे शहर हे स्मार्ट सिटी व्हावे यासाठी ठामपा, जिल्हाधिकारी हे राज्य शासनाच्या सहकार्यानं विविध स्मार्ट योजना ठाण्यात राबवित आहेत. यामध्ये स्मार्ट रस्ते, मलनिस्सारण, पाणी नियोजन, पर्यावरण या विषयांमध्ये विविध योजना शासनाकडून राबविल्या जात असतानाच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सोसायटÎांच्या अंर्तगत स्वचछतेसाठी हॉस्पिटॅलिटी म्हणजे आतिथ्य व्यवस्थापन खुप आवश्यक झाले आहे. यातीलच एक ठाण्यातील ग्रोथ फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हीस ही संस्था गृहसंकुलांना सेवा देण्यात अग्रेसर असलेल्या अक्षय कोळी यांना रुस्तमजी या गृहसंकुलातील स्वच्छतेसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
    ग्रोथ फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हीस माध्यमातून गृहसंकुलांना सुरक्षा, स्वच्छता, वायरमन, फ्लंबर, घंटगाडी वाहन चालक, बाग कामासाठी माळी, कचरा वेचक, उद्वाहन चालक, क्लब हाऊस व्यवस्थापन, आदी सेवा पुरविण्यात येतात. केवळ गृह संकुलेच नव्हे तर रुग्णालये, उद्योग संस्था समुह यांनादेखील माणसं उपलब्ध करून देण्यासाठी ग्रोथ नेहमीच अग्रेसर आहे. अक्षय कोळी यांनी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये ठाण्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad