गेल्या वर्षी 492 शेतक-यांना लाभ ; आंब्यासाठी पिक विमा योजना ३१ डिसेंबरपर्यंत विमा हप्ता भरा
ठाणे दि २६: प्रधानमंत्री फसल वीमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत पिक विमा योजना सन 2018-19 मध्ये आंबिया बहारकरीता आंबा पिकाकरिता ठाणे जिल्ह्यात लागू झाली आहे. विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 31 डिसें अशी आहे. या योजनेत ठाणे जिल्ह्यात 2017-18 मध्ये एकूण 492 शेतक-यांना रुपये दोन कोटी तेवीस लाख चौवेचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट इतका लाभ मिळाला आहे.
योजनेची उद्दिष्टये-
अवेळी पाऊस, कमी - जास्त तापमान, गारपीट या हवामान धोक्यापासून आंबा उत्पादकांना संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे.
फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक धैर्य राखणे
ठाणे जिल्ह्यासाठी योजना कार्यान्वत करणारी विमा कंपनी-
एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्चेंज
टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्री, फोर्ट, मुंबई- 400 023,
फोन नं. 022 61710912, टोल फ्रि नंबर 18001030061,
ई मेल - mhwbcis@aicofindia.com
फळपिक विमा योजनेस पात्र शेतक-यांचे निकष :-
अधिसूचित महसूल मंडळातील फळपिके आंबा, घेणारे सर्व शेतकरी
आंबा फळपिक कर्जदार शेतक-यांना ही योजना सक्तीची राहील
बिगर कर्जदार शेतक-यांना ही योजना ऐच्छिक राहील
अधिसूचित तालुका निहाय महसूल मंडळ
विमाधारक शेतक-यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकांची माहिती विमा कंपनीस/संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल ग्रामविकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
योजनेची उद्दिष्टये-
अवेळी पाऊस, कमी - जास्त तापमान, गारपीट या हवामान धोक्यापासून आंबा उत्पादकांना संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे.
फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक धैर्य राखणे
ठाणे जिल्ह्यासाठी योजना कार्यान्वत करणारी विमा कंपनी-
एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्चेंज
टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्री, फोर्ट, मुंबई- 400 023,
फोन नं. 022 61710912, टोल फ्रि नंबर 18001030061,
ई मेल - mhwbcis@aicofindia.com
फळपिक विमा योजनेस पात्र शेतक-यांचे निकष :-
अधिसूचित महसूल मंडळातील फळपिके आंबा, घेणारे सर्व शेतकरी
आंबा फळपिक कर्जदार शेतक-यांना ही योजना सक्तीची राहील
बिगर कर्जदार शेतक-यांना ही योजना ऐच्छिक राहील
अधिसूचित तालुका निहाय महसूल मंडळ
विमाधारक शेतक-यांनी गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपिकांची माहिती विमा कंपनीस/संबधीत मंडळ कृषि अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी जिल्हा महसूल ग्रामविकास व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
सफळपिक निहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकरी हिस्सा इत्यादी (नियमित-गारपीट वगळून)
अ. क्र.
|
फळपिक
|
विमा संरक्षित रक्कम
|
शेतकरी हिस्सा
|
1
|
आंबा
|
1,21,000
|
6050
|
· वाढीव विमा संरक्षित रक्कम, गारपीट विमा दर व शेतकरी हिस्सा इत्यादी (गारपीट करिता)
अ. क्र.
|
फळपिक
|
विमा संरक्षित रक्कम
|
शेतकरी हिस्सा
|
1
|
आंबा
|
40333
|
2017
|
तरी पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजने मध्ये कर्जदार शेतक-यांसाठी अनिवार्य आहे. तर बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक स्वरुपाची आहे. बिगरकर्जदार शेतक-यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभाग घेवून हवामानाच्या धोक्यापासून पिक संरक्षण करावे. तरी सदर योजनेचा शेतक-यांनी लाभ घ्यावाअशी विनंती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केली आहे.
No comments