Header Ads

  • ताजा खबरें

    चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा साक्षरता अभियान चित्ररथाचे उद्घाटन

    ठाणे दि ३: ठाणे जिल्ह्यात आता हिरवागार चार उत्पादन करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे माहिती व प्रात्यक्षिके देण्यात येणार आहेत. यासाठी १० जानेवारीपर्यंत राबविण्यात येणाऱ्या चारासाक्षरता अभियानाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
    ठाणे जिल्ह्यामध्ये संभाव्य चारा टंचाई स्थिती लक्षात घेता पशुसंवर्धन विभागामार्फत चारासाक्षरता अभियान राबविण्यात येत असून त्याचा चित्ररथ भिवंडी,शहापूर, मुरबाड,अंबरनाथ व कल्याण तालुक्यातील गावामध्ये फिरविण्यात येणार आहे
    या अभियानामध्ये पशूपालक व दुग्धउत्पादक शेतकर्‍यांना स्थानिक पातळीवर त्यांच्याकडे उपलब्ध असलेला हिरवा व वाळलेला चार्‍याचे योग्य नियोजन, आधुनिक व्यवस्थापन, साठवणूक पध्दती, चार्‍याची बचत, व्यवस्थापन , चार्‍यापासून मुरघास तयार करणे व टिकविणे, चार्‍याची सकसता व पाचकता वाढविणे तसेच अझोला व हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे हिरवा चारा उत्पादन करणे बाबत माहिती व प्रात्यक्षिके तज्ञाकडून देण्यात येणार आहे.
    याचा लाभ पशुपालकानी व दुग्धउत्पादक शेतकर्‍यांनी  घ्यावा असे आवाहन जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त  डॉ.विनोद राईकवार , जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ.लक्ष्मण पवार यांनी केले. सदरील उद्घाटन कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील पशुसवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त पशुसवर्धन डा.उमेशवैद्य,डा.विवेक पाटील, डा.अशोक सिंग तसेच पशुधन विकास अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक कर्मचारी हजर होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad